भुसावळात ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे निबंध स्पर्धा

0

भुसावळ (प्रतिनिधी)- राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. नववी ते दहावीसाठी ‘जागो ग्राहक जागो’ तर इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ग्राहकांचे शोषण’ हा विषय देण्यात आला आहे.

निबंध स्व-हस्ताक्षरात मराठी भाषेत लिहा लिहावा, त्याव स्वतः चे नाव, शाळेचे नाव व पत्ता, इयत्ता ही माहिती स्वतंत्र कागदावर लिहून तो कागद निबंध लिहिलेल्या कागदाला जोडावा व 15 डिसेंबर 2019 पर्यंत हा निबंध प्र.ह.दलाल, कन्हैया लाल प्लॉट्स, जामनेर रोड, भुसावळ, 425201, आयोजक अध्यक्ष व जिल्हा कार्यकारीणी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र येथे पाठवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आयोजकांचा निर्णय अंतिम राहणार असून प्रत्येक गटातून पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक निवडले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.