निपाणे ता, एरंडोल (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या भातखेडे येथील विकास मंच तर्फे दि,२८ मे रोजी होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन होमिओपॅथी गोळ्या वाटून सामाजिक बांधिलकी राखली गोळ्या सकाळी आनसिपोटी घ्याव्यात तसेच त्यावर अर्धा तास काही खाऊ नये व गोळ्या घेई पर्यंत तिन दिवस कच्चा कांदा खाऊ नये असे आवाहन करण्यात आले. भातखेड्याचे विकास मंच च्या कार्य कर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून सामाजिक शैक्षणिक पर्यावरण तसेच डिजिटल शाळा करण्यावर भर दिला आहे.
विद्यार्थ्यांना लागणारी शैक्षणिक साहित्य यावरही भर देवून गुणी गुणवत्ता पात्र विद्यार्थी घडविण्यावरही भर
दिला जातोय. शासनाच्या विविध योजनांची गाव पातळीवर माहिती देण्याचे काम कार्य कर्ते करत आहेत. विना राजकारण सामाजिक काम करण्याचा वसा विकास मंच च्या कार्य कर्त्यांनी घेतल्याने गावकऱ्यांनी संघटनेचे कौतुक केले आहे.