भगवान महावीर यांना अभिवादन

0

जळगांव:– समस्त मानवजातीला अहिंसा परमो धर्म असा मौलिक संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती  जळगांव महानगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व जनसेवा विचारधारा फाऊंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने साजरी करण्यात आली . यावेळी भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

पद्मालय शासकीय विश्राम गृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद सपकाळे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ उद्योजक कंवरलाल संघवी यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक भारत ससाणे यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांनी भगवान महावीराची अहिंसेचा संदेश व उपदेश आपल्या मनोगतातून व्यक्त केला .

यावेळी जगात शांती व अहिंसा राहावी यासाठी सामुदायिक मंगलकामना करण्यात आली.सूत्रसंचालन जनसेवा विचारधारा फाऊंडेशनचे निलेश बोरा यांनी केले.यावेळी जळगांव महानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद(पिंटु) सपकाळे, दत्तात्रय तायडे,किरण वाघ,गमिर शेख,सलाउद्दीन शेख, राजेश पोलडिया, नितीन पाटील,अमोल सपकाळे,बंटी सोनवणे,भीमा भालेराव,अमोल पिंगळे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.