पुढील चार दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

0

औरंगाबाद । राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास हवामान अनुकूल होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात राज्याच्या किनाऱ्यापासून ते केरळपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा व देशाच्या उत्तर भागात सक्रिय असलेला मान्सूनचा आस यामुळे १४ ते १७ जुलै हे चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

कुलाबा वेधशाळेनुसार, राज्यात १४ ते १७ जुलै या काळात उत्तर महाराष्ट्र वगळता इतरत्र सर्वत्र पावसाचा जोर जास्त राहील. नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. नाशिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस.

Leave A Reply

Your email address will not be published.