शेतकरी वर्गाची शासनाकडे आर्त हाक
निपाणे, ता. एरंडोल(वार्ताहर) : निपाणेसह परीसरात दि, २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटात सह जोरदार पाऊस झाला म्हणजेच ढग फुटीच झाली त्यामुळे नदी नाल्यांना पुर जावून सर्वच पिके अक्षरसा जमिनीवर लोळली आहेत म्हणजे यंदा देखील शेतकरी वर्गाचे जे स्वप्न होते ते भंगले आहे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास यंदाही निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकार मायबाप आता पंचनामे नकोत शेतकऱ्याला आर्थिक मदत देवून उभे करणेआवश्यक आहे.
गेल्यादोन वर्षांपासून नैसर्गिक संकटे शेतकर्यांचे पार कंबरडे मोडून टाकत आहे. त्यामुळे बळीराज्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला असून आर्थिक खाईत लोटला गेला आहे. आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पंचनामे नकोत शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.