निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या दोन दिवसांपासून निपाणे परीसरात दररोज पाऊस आपली हजेरी लावत असून दि, १५ जुलै रोजी सकाळ पासून ते सायंकाळ पर्यंत पाऊस सुरू असल्यामुळे सुर्याचे दर्शन झाले नाही. मात्र दमदार पाऊस होत असल्याने शेतकरी वर्गही समाधानी झाले आहेत आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना या म्हणी प्रमाणे निसर्ग हा शेवटी निसर्गच आहे आपल्याला आपली चिंता आहे परमेश्र्वराला सर्वांची काळजी आहे म्हणतात ना तुझी चिंता त्यासी सर्व आहे मारणारा पेक्षा तारणारा बलवान असतो पिक परिस्थिती धोक्यात आली होती परंतु पाऊस आल्याने व कोमेजले पिके हिरवीगार झाली असून डोलू लागली आहेत त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे