हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले

0

भुसावळ (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज १५ जुलै बुधवार रोजी दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने दुपारी एक वाजेला हतनूर धरणाचे ३६ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यातून ३० हजार ५१६ क्युसेक्स इतक्या प्रचंड  पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सकाळी १० वाजेपर्यंत १४ दरवाजे उघडली होती त्यानंतर धरणाच्या जलपातळीत वाढ झाल्याने दुपारी १ वाजता ३६ दार अर्धा मिटरने उघडण्यात आली. तसेच धरणाची जलपातळी २०९.४८० मीटर पर्यंत पोहचलेली.

धरणात बुधवार रोजी १७९.६० दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन सुरु आहे यामुळे रेल्वे , आयुध निर्माणी, दीपनगर वीजनिर्मीती केंद्र हे बंद असल्याने  पाण्याचा जास्त  वापर असलेल्या ठिकाणी पाण्याचा वापर न झाल्याने जलसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर  या तालुक्यातील ३८ हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उपअभियंता पी.एन. महाजन यांनी दिलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.