नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात धक्कदायक घटना घडली आहे. इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दलातील (ITBP)एका जवानानं आज, बुधवारी सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये ६ जवानांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. आटीबीपीचे आयजी पी.सुंदरराज यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नारायणपूर जिल्ह्यातील आटीबीपीच्या कॅम्पमध्ये आज सकाळी गोळीबार झाल्याचा आवाज झाला. यामध्ये ६ जवानांचा मृत्यू झाला तर ज्या जवानाने गोळीबार केला त्याचादेखील मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार जवानांमध्ये झालेल्या वादातून हा गोळीबार झाला. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, राज्याचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या घटनेचा तपशील मागवला असून अधिक तपास सुरु आहे.