मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून काही केल्या कमी होत नाहीय. गुरूवारी दिवसभरात राज्यामध्ये १६०२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ वर पोहोचली आहे. दिलादायक बाब म्हणजे राज्यात सध्या २०,४४१ रुग्ण उपचार घेत असून, ६०५९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
दुसरीकडे टाळेबंदीमुळे दैनावस्था झालेल्या देशातील स्थलांतरित मजुरांना अखेर केंद्र सरकारने दिलासा दिला. स्थलांतरित मजुरांना पुढील दोन महिने विनाशिधापत्रिका मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. शेतकरी, फेरीवाले, छोटय़ा व्यावसायिकांनाही विविध योजनांद्वारे केंद्राने मदतीचा हात दिला आहे.