दहावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींनी मारली बाजी

0

मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या वतीनं दहावीचा निकाल अधिकृतरित्या जाहीर झाला असून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. राज्यातील ७७ टक्के विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवलंय. तर नेहमीप्रमाणेच यंदाही विद्यार्थिनींनीच बाजी मारलीय.

मार्च २०१९ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ज्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या होती ७ लाख ४८ हजार ७१५ आणि विद्यार्थ्यांची संख्या होती ८ लाख ७० हजार ८८७. या सगळ्यांपैकी एकूण १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ७७.१० टक्के लागला आहे. यामध्ये विद्यार्थिनींचा निकाल हा ८२.८२ टक्के इतका लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल आहे ७२.१८ टक्के त्याचमुळे यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या तुलनेत १०.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १० जूनपासून अर्ज करता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

निकालाची विभागनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे:
पुणे : ८२.४८
नागपूर: ६७.२७
कोकण : ८८.३८
औरंगाबाद : ७५.२०
मुंबई – ७७.०४
कोल्हापूर – ८६.५८
अमरावती – ७१.९८
नाशिक – ७७.५८
लातूर – ७२.८७

Leave A Reply

Your email address will not be published.