तृतीयपंथीच्या खूनप्रकरणी ४ आरोपींना ५ दिवस कोठडी

0

बोदवड :- तालुक्यातील नाडगाव शिवारातील उजनी दर्गाजवळ चंदा उर्फ कैलास या तृतीयपंथीयाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या कमळगाव (ता.चोपडा) येथील चारही आरोपींना सोमवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

संशयित आरोपी संदीप कैलास साळुंखे (वय ३०), राहुल विष्णू ठाकरे (वय ३२), आकाश जयवंत सोनवणे (वय २०) आणि अतुल हिरालाल धनगर (वय २२, सर्व रा.कळमगाव, ता.चोपडा) यांनी चंदा उर्फ कैलास (मूळ रा.टाकरखेडा ता.एरंडोल) याचा दोरीने गळा आवळून व चाकूने चेहरा, छाती आणि गळ्यावर वार करून निर्घृण खून केला. यानंतर पलायनाच्या तयारीत असताना पोलिसांनी चौघांना शिताफीने अटक केली होती. दरम्यान, मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात सोमवारी डॉ.शोएब खान यांनी मृत चंदाचे शवविच्छेदन केले. त्यात चेहरा, गळा व छातीवर वार आणि दोरीने गळा आवळून खून झाल्याचे समोर आले. मृत चंदाच्या भावाने मृतदेह ताब्यात घेवून टाकरखेडा येथे अंत्यसंस्कार केले. भुसावळचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी सोमवारी दुपारी १ वाजता घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. तर चारही आरोपींना सोमवारी बोदवड दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायाधीश एस.डी.गरड यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Leave A Reply

Your email address will not be published.