वरणगाव, प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
याबाबत वृत्त असे की, मुळ तळवेल येथील रहिवाश व हल्ली मुक्काम कर्की ता.मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असलेले मुकुंदा रघुनाथ भारसके ( वय-५२ ) हे आपल्या मुळ गावी आल्या नंतर तळवेल शिवारातील भोगावती नदी वरील केटी बंधाऱ्याच्या पाण्यात मुकुंदा यांचा मृतदेह तरगत असल्याचा येथील गुराखीला दिसताच त्याने पोलीस पाटील ज्ञानदेव पांचपाडे यांना माहिती दिली. त्यांनी वरणगाव पोलीसात खबर दिल्याने वरणगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पो.हे.काॅ. अजय निकम करीत आहे.