जामनेर(प्रतिनिधी):-तालुक्यातील होळहवेली येथील रहिवाशी सचिन भगवान चव्हाण वय 22 यांचा काल सकाळी 8:30 वाजेला भागीदारीने केलेल्या शेतातील विहिरीवर बसविलेल्या इले. पंपच्या स्टार्टर च्या पेटी मधील तुटलेल्या केबल ला हात लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे,कीं तालुक्यातील होळहवेली येथील शेतकरी भगवान चव्हाण यांनी दुसऱ्याची तीन एकर शेती भागीदारीने(बटाईने)केलेली होती.त्या शेतात त्यांनी गव्हाची पेरणी केलेली होती. गव्हाला पाणी भरण्याकरिता त्यांचा सर्वात लहान मुलगा भगवान हा शेतात गेला होता. त्यावेळी इले. मोटार सुरु करण्याकरिता तो स्टार्टर बसविलेल्या पेटीजवळ गेला व त्याने पेटीमध्ये स्टार्टर चे बटन दाबण्याकरिता आपला हात टाकला असता त्याला जबरदस्त शॉक लागून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हि घटना त्याचे वडील जेव्हा शेतात गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आली.पेटीमधील केबल तुटलेली असल्याचे त्याच्या लक्षात न आल्याने ही घटना घडली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यांच्या वडिलांनी सदरील घटना गावातील लोकांना सांगितली.गावकऱ्यांच्या मदतीने सचिन ला जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने होळहवेली गावसह परिसरात शोककळा पसरली आहे. सचिन च्या पश्चात आई, वडील एक भाऊ व एक बहीण आसा परिवार आहे.जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.