अमळनेर (प्रतिनिधी):-अमळनेरातील झामी चौक व बालाजीपुरा भागातील युवकांचा मालेगाव जवळ असलेल्या जळगाव चोंडी गावाजवळ ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु तर एक गंभीर जखमी झाला आहे.
दि.१४ रोजी दुपारी १ वाजता विकास जगन्नाथ ईशी,गणेश चौधरी, प्रीतम ठाकुर, चंद्रकांत पाटील हे चौघे जण प्रीतमचा भाऊ हर्षल ठाकुर जो पुण्याहुन शिर्डी पर्यंत आला होता त्याला घेण्यासाठी गेले होते.
तिघे एका दुचाकीवर निघाले होते. तर चंद्रकांत आणि हर्षल वेगळ्या दुचाकीने घराकडे येण्यासाठी निघाले होते. मालेगाव जवळील जळगाव चोंडी गावाजवळ ट्रकने धडक दिल्याने विकास जागीच ठार झाला तर गणेश व प्रीतम ला मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता गणेशचा देखील मृत्यु झाला. प्रीतम गंभीर जखमी झाला आहे.