जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. आज शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक नोंदली गेली. आज दिवसभरात ६८१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.जिल्ह्यात मृताचा आकडाही कमी होतानाचे दिसून येत आहे. आज ०९ जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या आकडेवारी नंतर जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १ लाख ३३ हजार ८९३ झाली आहे. दिवसभरात ८११ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २१ हजार ७८२ वर पोचला आहे.तर जिल्ह्यात मृताचा एकूण आकडा २३९५ वर गेला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर ६०, जळगाव ग्रामीण १६, भुसावळ ८२, अमळनेर २९, चोपडा ६८, पाचोरा ४, भडगाव ०३, धरणगाव २९, यावल३२, एरंडोल ४४, जामनेर १६, रावेर ४७, पारोळा ३५, चाळीसगाव ९२, मुक्ताईनगर ७३, बोदवड ३४, अन्य जिल्ह्यातील १८.