चार जोडीपी विवाह बद्ध
जळगाव – नशिराबाद येथील खिदमते खल्क फाउंडेशन व जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी पुरस्कृत मुस्लिम समाजातील सर्व बिरादरीचा सामूहिक विवाह सोहळाचे आयोजन नशिराबाद येथील के. एस. टी च्या प्रगणत हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडले एकूण चार जोडपी चे लग्न या विवाह सोहळ्यात लावण्यात आले.
लग्न सोहळ्याचे प्रास्ताविक करताना फारुक शेख यांनी सामूहिक विवाहाचे महत्व विषद केले, या सामूहिक विवाहातील सर्व वधूंना जिल्हा मन्यार बिरादरी तर्फे ५० भांड्यांचा सेट भेट म्हणून देण्यात आले. तसेच वर-वधू कडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क घेण्यात आले नाही एवढेच नव्हे तर कोणत्याही पाहुणे मंडळीकडून आहेर सुद्धा घेतले गेले नाही. विवाहाचा संपूर्ण खर्च फाउंडेशन,जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी केला.
यांचे झाले लग्न
फातेमा बी सह आसिफ शाह ■अरशिया बी सह खालील खान ■हिना कौसर सह शेख गुलाम ■शगुफ्ता परवीन सह आसीफ