जळगावात कापसाच्या गोदामाला आग ; लाखों रुपयांचा कापुस जळून खाक

0

जळगाव (प्रतिनिधी) । शहरातील भवानी पेठेतील जमुना मार्केटमधील कापसाच्या गोदामाला शॉर्टसर्किट मुळे आग
लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या आगीत सुमारे सव्वा तीन लाखांच्या किंमतीचा कापूस जळून खाक झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत सविस्तर असे की, हेमराज रामचंद्र चौधरी (वय-५५) रा. अयोध्या नगर, यांचे शहरातील भवानी पेठेतील जमुना मार्केटमध्ये गाळा आहे. त्यांच्या शेतातील कापूस त्यांनी या गाळ्यात भरून ठेवला होता. आज सकाळी गाळ्याच्या बाहेर इमरतीवर इलेक्ट्रीच्या शॉर्टसर्कीटमुळे कापसाला आग लागली होती. महापालिकेच्या पंपाला बोलावून ही आग विझविण्यात आली होती. यात सव्वा तीन लाख रूपये किंमतीचा ६५ क्विंटल कापूस अर्धवट जळाला होता. पहिल्या बंबाच्या पाण्यात पुर्णपणे न विझल्याने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुन्हा कापसाने पेट घेतला. पुन्हा महापालिकेचा बंब बोलाविण्यात आले होते. दरम्यान एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी येवून शॉर्टसर्किटच्या वायरी काढून घेतल्या एमएसईबीच्या भोंगळ कारभारामुळे ही आग लागल्याचा आरोपी हेमराज चौधरी यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.