घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर ;- जम्मू-काश्मीरच्या सीमामधून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव आज सुरक्षा दलाने हाणून पाडला. तंगधार सेक्टरमधून घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. दहशतवाद्यांविरोधातील या मोठ्या कारवाईनंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम सुरूच ठेवली आहे.

रमजानच्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचं पालन करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर दहशतवाद्यांच्या कारवायात मोठी वाढ झाली आहे. दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आलं आहे. शुक्रवारी रामबन जिल्ह्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे ठिकाण उद्धवस्त केले होते. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला होता. यावेळी लष्कराने एके-४७ रायफल, एक ३०३ रायफल, ३६ एमएमची एक पिस्तूल, एक ग्रेनेड लॉन्चर, एके-४७ रायफलची एक मॅगझीन, ३०३ रायफलची एक मॅगझीन आणि ६ राउंड काडतूस जप्त केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.