वरणगाव : कोरोनाचा आजारामुळे आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेने त्यांच्या वारसाला कोणतेही निकष नलावता त्यांना त्वरीत कामावर घेण्यात यावे या मागणीचे निवेदन कामगार संघटनेच्या वतीने निर्माणी महाप्रबधकास देऊन करण्यात आली आहे
देशात कोरोनाचे सर्वत्र सावट असुन अनेक शासकीय कर्मचाऱ्याचा या आजारा मुळे अनेक कर्मचाऱ्याचा यात मृत्यू होत असल्याने त्यांच्या कुंटुबावर दुःखाचा डोगर कोसळत असून घरातील कमावता मानुस अचानक पणे निघुन गेल्याने त्यांच्या कुंटुबावर आर्थीक परिस्थाचा सामना करवा लागत आहे त्यात शासनाची कोणतीही अर्थीक मदत लवकर मिळत नसल्याने त्यांच्या वारसाला संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे या आजारामुळे मृत झालेल्या वारसाना सरकारने कोणतेही निकष न लावला त्यांना त्वरीत कामागावर घेण्यात यावे आशा मागणीचे निवेदन कामगार संघटनेचे अध्यक्ष विशाल भाल शंकर यांनी आयुध निर्माणी महाप्रबंधक यांना दिले असुन आयुध निर्माणी बोर्डा प्रर्यत या भावाना कळविची विनंती केली आहे