जळगाव : जळगावातील एमआयडीसीमध्ये एक दुर्दैवी घटना घडलीय. एका केमिकल कंपनीतली टाकी साफ करती असताना तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी घडलीय.
प्राप्त माहितीनुसार रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी ३० चिंचोली या. यावल, दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) आणि आणि मयूर विजय सोनार (वय ३०, रा. कांचननगर, जळगाव) ही यातील तिन्ही मृतांची नावे आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी तिघांना तपासून मृत घोषीत केले. तर याबाबत संबंधीतांनी पत्रकारांना काहीही माहिती देण्यास नकार दिल्याने याचे गुढ वाढले आहे. हे तिन्ही कामगार केमीकल कंपनीत कामाला होते. टाकी साफ करत असतांना त्यांचा मृत्यू झाला असून तिघांचे मृतदेह सिव्हील हॉस्पीटलमध्ये आणले आहेत.