भुसावळ (प्रतिनिधी) –तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे . हा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील यांनी तीन दिवस बंद पाळण्याचे आवाहन करून गावात गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
तालुक्यात व शहरात कोरोनाने कहर केला आहे. कुऱ्हे पानाचे येथे मात्र तीन महिने गाव कोरोना पासून दूर होते. ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात काळजी घेत होते. कोरोना शहर व तालुक्यात मात्र वाढतच असल्यामुळे या गावात शिरकाव केला. एका तरुणाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. हा संसर्ग गावात वाढू नये यासाठी तो परिसर सील करण्यात आला आहे. ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात काळजी घेत आहे.
सुभाष पाटील यांनी तीन दिवस गाव बंद ठेवण्यात यावे असे आवाहन केले. ग्रामस्थांनी या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला.शेती,कृषी,दूध डेअरी,मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा सोडून ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवले.यानंतर सुभाष पाटील व मित्र परिवार मिळून गावात सोशल डिस्टन्सचे पालन करून गोळ्यांचे वाटप केले.