यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनगाव गावाजवळ बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावर आज सायंकाळी झालेल्या दोन मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात तिन जणं जखमी झाले आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावर किनगाव गावाजवळ झालेल्या दोन दुचाकी मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात यावल येथील आयशानगर मधील रहिवाशी जहॉगीर फत्रु पटेल वय४२ वर्ष , राजु लतीफ पटेल वय३९ वर्ष हे त्यांच्याकडील मोटरसायकलीने जळगावहुन यावल कडे येतांना यावल कडुन जळगावकडे जातांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक सुधाकर चोपडे वय४९ वर्ष यांच्याकडील मोटरसायकलने समोरासमोर धडक देवुन झालेल्या अपघातात हे तिघ जणं जख्मी झाले असुन जख्मीना तात्काळ घटना स्थळावरून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .बी.बी.बारेला व त्यांच्यासह सुर्यकांत पाटील , नाना घोडके व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक औषद्यपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.