एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल नगरपरिषदेने अंजनी नदीकाठावर नागरिकांनी केलेल्या अतिक्रमण काढले. अंजली नदीकाठी नागरिकांनी टपरी टाकून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले होते. याची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने नदीकाठी असलेल्या टपरीधारक फारुख खाटीक,अंजुम हाशिम शेख,सलीम शेख, मजीद शेख यांचे अतिक्रमण काढले आहे.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संजय ढमाल कार्यालय अधीक्षक,विनोद कुमार दगाजी पाटील अतिक्रमण विभाग प्रमुख ,गौरव बागुल, सुरेश दाभाडे ,रघुनाथ महाजन,तुषार शिंपी, कैलास देशमुख ,भूषण महाजन शहर तांत्रिक अधिकारी, राहुल ठाकूर या पथकाने कारवाई केली.
दरम्यान कोणत्याही नागरिकांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यास नगरपालिका प्रशासन कारवाई करेल असा इशारा यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी दिला.