एकाच कुटुंबातील तिनं भावंडांच्या मृत्यूने वाघळीगावत शोककळ

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाघळी गावातील सख्या तिन भावाचा एका पाठोपाठ करोनामुळे मृत्यू झाल्यामुळे वाघळी गाव भितीने पूर्ण हादरले आहे. विलास भोळे, प्रदीप भोळे, वसंतराव भोळे हे तिघे भाऊ उद्योग धंदा निमित्त नाशिक येथे स्थायिक झाले आहेत. परंतु 29 जून रोजी वाघळी गावात आतेभावाच्या अंत्यविधीसाठी आले असता दुर्दैवाने वाघळी येण्याची ही अखेरची भेट होती, विलास भोळे वय६२ त्यांचे दुसरे बंधू प्रल्हाद भोळे वय ६०,तर तिसरे बंधू वसंतराव भोळे वय ६५ असे तिघे भाऊ एका पाठोपाठ गेल्याने संपूर्ण वाघळी गावात दुःखची छाया पसरली आहे, हे तिघे भाऊ एका कुटुंबातील होते जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती विद्यमान सदस्य पोपट तात्या भोळे यांच्या भाऊबंदकीतील होते, त्याच कुटुंबातील अजून दहा सदस्य बाधिल असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.