आयुध निर्माणीच्या सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला

0

वरणगांव : आयुध निर्माणी चे सुरक्षा दरबार मुख्य रुग्णालयाजवळील पाॅईंटजवळ कर्तव्य बजावीत असताना ओमनी गाडीतील चार ते पाच व्यकींनी डोळ्यात मिरची पुड टाकुन त्यांना मारहाण करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करुन घटनास्थळावरून पसार झाले.

याबाबतची माहिती अशी की, वरणगाव आयुध निर्माणी मध्ये सुरक्षा विभागात काम करणारे मनोज अहिरराव व शांताराम जोहरे हे दोघे निर्माणीच्या मुख्य रुग्णालया जवळ आपले कर्तव्य बजावीत असतांना हतनुर गावाकडून आलेल्या एका अज्ञान ओमनी गाडीमध्ये चालकासह . पाच खुनशी प्रवृत्तीची माणसे त्यांचे जवळ आली व निर्माणी वसाहतीत जाण्यासाठी तगादा करू लागले . त्यांना प्रवेश नाकारून गाडीत काय आहे हे पाहात असतांना त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात बारीक मिरची पुड फेकली व हॉकी स्टीक ने मारहाण करून आलेल्या मार्गाने परत फिरले, यावेळी त्यांनी सुरक्षारक्षकांच्या बॅटरीची व काठीची मोडतोड करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान येथील सुरक्षा रक्षकांकडे स्वतःच्या बचावासाठी कुठलेच हत्यार नसते. सदरच्या गाडीमध्ये गुटखा किंवा दारू असल्याचे शंका व्यक्त होत असून या जीवघेण्या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे. त्यांना आयुध निर्माणी च्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.या हल्ल्यामुळे रक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे घटनेनंतर कर्नल अनिल मंकोटिया तसेच सुरक्षा विभागाचे कनिष्ठ कार्य प्रबंधक एन पी वाघ, एल पी इंगळे, कामगार संघटनांचे पदाधिकारी आदींनी घटनास्थळी भेट दिली .व सदरची घटना पोलीस वरणगांव स्टेशनला कळाली असता पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी आले व पाहाणी केली. आयुध निर्माणी प्रशासनाकडून वरणगांव पोलीसात याबाबत खबर किंवा लेखी तक्रारीचा अर्ज आलेला नसल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नव्हता .
या घटने बाबत आयुध निर्माणीतील कामगार संघटना, भारतीय मजदूर संघटना , इंटक संघटनेने सुरक्षा रक्षकावर या हल्ल्याचा निषेध नोंदविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.