अमळनेर (प्रतिनिधी):-शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या जळोद व गांधली पंपगृह येथील वीजपुरवठा दि.२६ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने खंडीत झाला असल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने होणार असल्याची माहिती नगरपरिषदेने सर्व नागरिकांना दिली आहे.तरी नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.