दिल्ली ते मुंबई प्रवास होणार कमी वेळात; नितीन गडगरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्ली ते मुंबई या दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस-वे पुढील वर्षी फेब्रुवारी-२०२४ बांधून तयार होणार आहे. त्यामुळे मुंबई-दिल्ली या दोन महानगरातील प्रवासाचे अंतर कमी होत ते अवघ्या १२ तासांवर येणार असल्याची माहीती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडगरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले. देशात रस्त्यात जाळे उभारण्याचे काम वेगात होत असून, आम्ही सुरत ते नाशिक नवीन ग्रीन हायवे बांधणार असल्याचेही त्यांनी सांगितले

एका खाजगी वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस-वे चे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते पूर्ण होणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडगरी यांनी देशातील रोड नेटवर्कच्या जाळ्याबद्दल माहिती दिली. आपल्या देशात ६५ लाख किलोमोटारचे रस्त्याचे नेटवर्क आहे. आम्ही कश्मीर ते कन्याकुमारी रस्त्याचे जाळे उभारत आहोत आम्ही प्रत्येक हायवे आणि एक्सप्रेस-वे उभारण्यात पैशांची बचत करीत आहेत. एकट्या राजधानी दिल्लीत ६५,००० लोटी रुपयांचे प्रकल्प सुरु असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

सुरत ते नाशिक ग्रीन हायवे
आम्ही सुरत ते नाशिक ग्रीन हायवे बांधत आहोत. नाशिक ते अहमदनगर आणि येथून सोलापूर हा मार्ग बांधण्याची योजना आहे. आम्ही म्यानमार, बांगलादेश आणि भूतान रस्ते बांधत आहोत. आम्ही नेपाळसाठी रस्ते बांधत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. इलेकट्रीक वाहनासंदर्भात नितीन गडकरी यांनी सांगितले की जे तुम्ही पेट्रोल डिझेल गाड्यांसाठी महिन्याला जर ३० हजार खर्च करीत असल तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी केवळ २,००० रुपये खर्च येईल, येत्या काही दिवसात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील असेही ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.