नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा, मंत्री गिरीश महाजन

प्रशासनाने शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी बांधावर जा गिरीश महाजन यांचे आदेश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात मागील १०-१५ दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस,सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांच्या रासायनिक खत टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या अनुषंगाने गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव तालुक्यातील वडली येथे कृषी केंद्रास भेट देऊन सदरील रासायनिक खतांची विक्री बंदची नोटीस देऊन खताचे नमुने संकलित करण्याच्या सूचना देऊन शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली.

तसेच पुढे पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना विभागांना दिल्या. तसेच कोणतीही कंपनी अथवा विक्रेता शेतकऱ्यांची फसवणूक करताना आढळल्यास अशा सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या असल्याचे सांगितले. यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉल द्वारे शेतकऱ्याची संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून अहवाल 24 तासात दाखल करण्याचे आदेश दिले.

पावसाळी अधिवेशनात कायदा होणार
शेतकऱ्यांची बोगस बियाणे व खतामुळे होत असलेल्या फसवणुकीची पोस्ट गांभीर्याने राज्य सरकारने घेतली असून या अनुषंगाने दिनांक 16 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानी संदर्भात विषय उपस्थित करून बोगस बियाणे व बोगस खत वाटप करणाऱ्या कंपन्याविरुद्ध कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असून याकरिता माननीय कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेले असून पावसाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर होणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पाणी दौऱ्या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी जगताप, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरविंद देशमुख, भाजपा तालुकाध्ययक्ष अमोल शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बोगस बियाणे व खतामुळे होणाऱ्या नुकसानीचे बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने जिल्ह्यातील वडली व कुऱ्हाड या गावांमध्ये प्रत्यक्ष येऊन पाहणी केली. मंत्रिमंडळातील झालेल्या निर्णयानुसार तात्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या ….

Leave A Reply

Your email address will not be published.