नवी दिल्ली! लोकशाही न्युज नेटवर्क –
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा (Heatwave in India) जारी केला आहे. एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये, हवामान विभागाने म्हटले आहे की, ‘पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, पश्चिम राजस्थान आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचाही इशारा दिला आहे.
याशिवाय, उत्तर प्रदेशातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, गंगेचे पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ मध्येही तापमान अधिक असण्याची शक्यता आहे.
माध्यमांशी बोलताना वरिष्ठ आयएमडी शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार म्हणाले की, एप्रिलपासून शेवटच्या काही दिवसांपर्यंत, सतत पश्चिम विक्षोभ वायव्य भारतावर प्रभाव टाकत आहे. ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांत तापमान वाढत आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे मे महिन्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
पंजाब आणि हरियाणामध्येही तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या जवळ आहे आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती उत्तर प्रदेशसारखीच आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील ५ दिवस आणि मध्यभागी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ४ दिवस, त्यानंतर हलके गडगडाटी वादळे येऊ शकतात, ज्यामुळे तापमान किंचित खाली येऊ शकते, असेही कुमार यांनी नमूद केले आहे.