टायर फुटले अन क्षणात होत्याचे नव्हते

भीषण अपघातात पाच जण जागीच ठार

0

 

पुणे | 

 

राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजही पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण कार अपघात होऊन पाच जण जागीच ठार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 येथे राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झालाय. या अपघातात गाडीचा पुढच्या बाजूचा पूर्णतः चुराडा झाला.

 

डाव्या बाजूचे टायर फुटले 

रफिक कुरेशी, (वय – ३४), इरफान पटेल (वय -२४), मेहबूब कुरेशी (वय – २४) आणि फिरोज कुरेशी (वय – २८), अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर सय्यद इस्माईल कुरेशी, असं जोखमीचं नाव आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली (टी एस ०७ जी एल २५७४) ही गाडी डाळज हद्दीत आल्यानंतर गाडीचा पुढील डाव्या बाजूचे टायर फुटले. यानंतर साधारण ५० मीटर गाडी जमिनीला घासत येऊन डाव्या साईडला चार ते पाच पलट्या खात ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला जोरात धडकली आणि नाल्यात जाऊन पडली.

गाडीत सहा पुरुष होते त्यापैकी ५ जण जागीच ठार झाले होते, तर एकजण गंबीर जखमी झालाय. तर यात सय्यद इस्माईल, सय्यद अमीर याला किरकोळ मार लागला आहे. सर्व तेलंगणा राज्यातील नारायणखेड येथील आहेत. अपघाताची माहिती समजताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आणि ठार झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.