अमळनेर ता शिरूड:- परिसरातील कापूस, उडीद मुंग सोयाबीन, तूर, या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून लागवड केली असून ज्वारी बाजीरी देखील पेहरणी झाली जून महिना संपत आला असून पाहिजे तसा पाऊस नाही या बाबत शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे
जून महिन्याच्या सुरवातीला झालेलं रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी, काडीकचरा वेचणी या कामांना गती देत लवकर आटोक्यात आणली कोरोना आजारामुळे गावातील ग्रामस्थ बाहेर जाऊन परत आल्यामुळे शेतीकामासाठी मजुरांची सध्या तरी कमतरता जाणवत नाही.तसेच सद्या ची स्थिती पाहता पावसाची वाट पाहत तहानलेल्या पिके आता पिके कोलमडाय ला लागली आहेत पाऊस येणार या चिंतेत बळीराजा आहे सकाळपासून रोज चे आभाळ भरून येते मात्र तीच संध्याकाळ होऊन जाते या उद्या येईल या आशयाने दिवस काढत असतो वेळोवेळी डोक्यात एकच विचार
आपले एवढे महाग मोलाचे मातीत पेहरलेले बी-बियाणे ाया च काय होईल ते मातीमोल होणार तर नाही या भीतीने तो भयभीत झाला आहे दिवसा भरून येणारे हे आभाळ यातून कधी येणार पावसाच्या सरी या आशेन बळीराजा चे डोळे आभाळाकडे एकटक आहेत