रावेर : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या नैराश्याने रावेर येथील एका विद्यार्थ्याने नाशिक येथे आत्महत्या केली. रुपेश भरत पाटील असे या मृत तरुणाचे नाव आहे.
यामुळे रुपेश पाटील हा नाशिक येथे एसवाय बी.ए.चे शिक्षण घेत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे रेल्वे,बस आणि वाहतुकीची सर्व साधने बंद झाल्यामुळे रुपेश याला घरी जाता आले नाही. या नैराश्यातून त्याने नाशिक येथे आत्महत्या केली.