जळगाव- तालुक्यातील रिधुर येथील ३४ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला ठिबक नळीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.भिमराव सखाराम कोळी (वय-३४) रा. रिधुर ता.जि.जळगाव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , भिमराव सखाराम कोळी हे शेतकरी असून शेतीचे काम करतात. शेतात नेहमीप्रमाणे शेतात गेले. त्यांनी शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला ठिबक नळीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेलं नाही . पोलीस पाटील प्रमोद निंबा पाटील यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.