जळगाव,दि.2
घुमर घुमर जारे रे बाईसा, तिजा तेरा रंग था मैतो, मोह मोह के धागे, मेरे कॉलेज की लडकी, झिंग झिंग झिंगाट, एक राधा एक मीरा, राधा ही बावरी, नवरी नटली, तनहाई तनहाई, अच्छा चलते है दुवा वो मे याद रखना, मराठ मोळी लावणी, एक दोन तीन अशी विविध बहारदार गीतांवर नृत्य व गायन स्पर्धेत स्पर्धकांनी बहारदार सादरीकरण केले. यावेळी स्पर्धक व विद्यार्थ्यांनी एकच ठेका धरला. कश्तीचे विशेष आकर्षण ठरले शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा वद हा पोवाडा. पोवाड्याच्या थरारक सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी प्रेकाक्षकांची चांगलीच दाद मिळविली. यावेळी विविध महाविद्यालयातून नृत्य, गीत गायन, कल का नायक व केस स्टडी, अंताक्षरी, फेस पेंटिंग, रांगोळी, पोस्टर सादरीकरण या स्पर्धांमध्ये 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेन्टमध्ये सुरु असलेल्या विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सव कश्ती 2018 या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी नृत्य, समूह नृत्य अंताक्षरी, गीत गायन या स्पर्धा जल्लोषात पार पडल्या
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, श्रीमती राजुल रायसोनी लाभले होते. प्रसंगी संचालिका डॉ.प्रीती अगरवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, विभागप्रमुख प्रा.रफिक शेख, कश्तीचे समन्वयक प्रा.राज कांकरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना महाविद्यालयातील तसेच इतर ठिकाणी आयोजित प्रत्येक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून आपला सर्वांगीण विकास साद्य करावा. समाज माध्यमांचा तरुणाई सर्वात जास्त वापर करीत आहे त्याचा आपल्या सकारत्मक कार्यासाठी उपयोग करा. आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे विसरुन चालणार नाही असे मत संचालिका डॉ.प्रिती अगरवाल यांनी व्यक्त केले.
कल का नायक या स्पर्धेत बेरोजगारी, शिक्षणाचे महत्व, पाणी प्रश्न, मतदान अधिकार, पर्यावरण सुरक्षा, लव मेरेज की अरेंज मेरेज, सामाजिक जबाबदारी, मानवी स्वभाव व वर्तणूक अशा अनेक विषयांवर चित्रफिती दाखवून स्पर्धकांना त्याविषयी आपले मत व्यक्त करायचे होते. एखाद्या विषयावर त्याच क्षणाला आपले मत व्यक्त करणे ही खूप कसरतीचे काम आहे. परंतु विद्यार्थ्यांची विचार क्षमता व संवाद सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येते. पोस्टर सादरीकरण स्पर्धेत विविध महाविद्यालयातून 73 विद्यार्थ्यांनी अनेक सामाजिक विषयांशी निगडीत सादरीकरण केले.
तसेच केस स्टडी या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी व्यवसाय व्यवस्थापनातील जी.एस.टी, मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्स आदी विषयांवर सखोल चर्चा केली. कार्पोरेट जगतात पाउल ठेवणार्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून चुरशीने स्पर्धा खेळल्या. तसेच अतिशय जाल्लोशात स्पर्धांचा आनंद घेतला. विध्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साध्य व्हावा, सादरीकरण कौशल्य विकसित व्हावे, सामाजिक बांधिलकी व समाजाप्रती जाणीव निमार्ण व्हावी या उद्देशाने ह्या स्पर्धा घेण्यात आल्यात.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post