यावल तालुक्यात चक्रीवादळामुळे शेतकर्‍यांच्या लाखो रुपयांच्या केळींचे नुकसान

0

यावल । तालुक्यातील सावखेडा सिम, दहिगाव, हरीपुरा, मोहराळा, विरावली शिवारात 26 एप्रिलच्या रात्री आलेल्या चक्रीवादळात शेतकर्‍यांच्या लाखो रुपयांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे मोहराळा परिसर अनेक शेतकरर्‍यांची उभी केळी पडल्याने लाखो रुपयांचा मोठा फटका बसला आहे. याच शिवारात यावल पंचायत समितीचे सदस्य व विरोधी पक्ष गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या शेतातील सुमारे ९ हजार केळींचे खोडे उन्मळून पडल्याने त्यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

यावल तालुक्यात आदीच विहीरीतील जलपातळी घटल्यानेकेळी बागायत पिके धोकादायक वळणावर असतांना, २६ च्या रात्री अचानक आलेल्या या चक्रीवादळाने शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेली केळी पिके निसर्गाच्या फटक्याने जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी फार मोठया संकटात सापडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.