मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून तो १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यात राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
पंतप्रधानांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिवरुन काय चर्चा झालीय त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ५ वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहे. त्यामुळे ते काय माहिती देतात याकडे सर्व राज्याच्या जनतेचे लक्ष लागून आहे.