मनूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

0

बोदवड :- तालुक्यातील मनूर बु येथील संतोष शामराव पाटील वय (34) ह्या शेतकऱ्याने दि.8 रोजी सकाळी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली.

याबाबत भगवान शामराव पाटील वय (48) यांच्या खबरी वरून बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरील मयत शेतकऱ्याची प्रकृती खराब झाल्याने त्यास उपचारासाठी बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.मयत संतोष पाटील याने काही तरी विषारी द्रव्य सेवन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांकडून कळले.घटनेचा पुढिल तपास पोलिस कॉन्स्टेबल श्री.भोसले करीत असून
मयत पाटील यांच्या पश्चिात आई, पत्नी,दोन भाऊ,दोन लहान मुलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत शेतकरी संतोष पाटील याच्याकडे शेती असुन अति पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले असल्याने जमिन चिघळलेल्या नैराश्या पायी मानसिक चितेंमुळे त्यांनी ही टोकाची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.