भुसावळ | प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता संपूर्ण भारत लॉक डाउन आहे . संचारबंदी काळात अनेक गोर गरीब जनतेचे जेवणाचे हाल होत आहे .22 मार्च पासून आज पर्यंत 5 दिवस झाले काम नसल्याने बाजारातून आणतील तरी काय व काय खाणार याकरीता म्हणून
भुसावळातील मिल्लत नगर ग्रुप च्या वतीने गरीबांना अन्न वाटप करण्यात आले .या वेळी मिल्लत गगृप चे शेख यूनुस मामा,बबूल शेख,शकील शेख, फुरकान अहमद, कैसर जाकीर हुसेन,कलीम शेख,अफजल शहा,अब्दुल्लाह फैजान,फैजान अशफाक,नवाज खान, नासिर कुरेशी यांनी बस स्टॅंड परीसरात व रेल्वे स्टेशन समोरील भागात गरीबांना अन्न व पाण्याचे बाटल्याचे वाटप केले,मिल्रत नगर गृप ने केलेला हा खुप चांगला उपक्रम आहे.