भुसावळकरांनी पाणी काटकसरीने व जपून वापरावे – महेन्द्रसिंग ठाकुर

0

पाणी न मिळाल्यास टैंकर ने पुरवठा

भुसावळ :- तापीनदी वरील बांधा-यातील पाणी संपले असल्याने २० मार्च पर्यंत भुसावळ येथील तापी नदी वरील बंधारा मध्ये पाणी पोहचण्यास काही काळ विलंब लागले, म्हणून ज्या भागात पाणी आले नाही त्यांना पालिकेमार्फत टँकरने पाणी पुरवठा करर्ण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती महेंद्रसिंग उर्फ पिंटू ठाकूर यांनी कळविली आहे. तसेच नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळा , पाण्याचा योग्य व माफक वापर करा , शहरवासीयांना पाण्यासाठी कुठलेही हाल सोसावे लागणार नाहीत त्यासाठी सत्ताधारी व पालिका प्रशासनाचे नियोजन झाले आहे. बांधा-यात पाणी येईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर करून पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.