बीड :- जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशीच आत्महत्या केली आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या खर्डेवाडी येथील महादेव रामभाऊ भोसले(३५) या तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. तर दुसरी घटना वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील दामू गणपती शिंदे (४५) या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेवून जीवन संपवले आहे.
महादेव भोसले यांच्या आत्महत्येने त्यांच्या दोन लहान मुलांचे पितृछत्र हरपले आहे. त्यांना शितल आणी कृष्णा अशी दोन मुलं आहेत. तरूण शेतकऱ्याने आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.