पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातील 41 हजार 379 शेतक-यांना 287.59 कोटी रूपयांची नुकसान भरपाई मंजूर

0

जळगाव : सन 2019-20 पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 42 हजार 179 शेतक-यांनी सहभागी होउन स्वत:चा एकूण रु. 35.72 कोटींचा विमाहप्ता ॲग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया ली. या विमा कंपनीमार्फत भरला होता. त्यापैकी 41 हजार  379 शेतक-यांना 54 हजार 124 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित रक्कम रु. 287.59 कोटी मंजूर झाले आहे. याकरिता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी  खरीप हंगाम चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व कोव्हीड 19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी संबंधित विमा कंपनी व कृषि विभागाच्या बैठका घेऊन तसेच शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांना फळपिक विमा मंजुर झाला आहे.

 

येत्या 15 दिवसात शेतक-यांच्या बँक खात्यावर रक्कम परस्पर विमा कंपनी कडून जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांची रब्बी पिक पेरणी वेळेत होऊन खरीपामधील नुकसान भरपाई काढण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.