पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन : भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ३ सैनिक ठार

0

श्रीनगर :- बिथरलेल्या पाकिस्तानने सीमेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाकिस्तानचे  ३ सैनिक ठार झाले आहेत. एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्याकडून दुपारी उरी आणि राजौरी भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यानंतर पाकिस्तानी सैन्याने गोळीबारात ५ भारतीय जवानांना ठार केल्याचा दावा केला. मात्र, हा दावा खोटा असल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. उलट पाकिस्तानच्या या नापाक हरकतींवर प्रत्युत्तर देताना केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचेच ३ सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.