पहुर कसबे गावाला शुध्द पाणीपुरवठा करा !

0

पहुर (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यातील पहूर कसबे गावाला शुध्द पाणीपुरवठा करा यासाठी आज पहुर कसबे ग्रामपंचायतला पहुर कसबे ग्रामस्थांनी निवेदन दिले.

पहुर कसबे ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामनेर तालुक्यातील पहुर कसबे गावातील नळांना शुध्द पाणी येत नसून या पाण्यापासून अनेक लोक आजारी पडत आहेत. पहुर गावात लाखो रुपयांचे जलशुद्धीकरण केंद्र असून ते बंद आहेत. शेंदुणीॅ रोडवरील जलशुद्धीकरण केंद्र सुरू करून पहुर कसबे गावाला शुध्द पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी पहुर कसबे ग्रामपंचायतकडे केली आहे. निवेदनाच्या प्रति माहिती व कार्यवाहीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामनेर यांना पाठविण्यात आल्या आहेत.   निवेदनावर किरण जाधव, वाघुर विकास आघाडीचे सुकलाल बारी, शे. शकील शे. महमंद, माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखेडे, नितीन चौधरी, संतोष झंवर, समाधान घोंगडे यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.