महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलं ! आजपासून आचारसंहिता लागू

0

नवी दिल्ली : राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आजपासून महाराष्च्र आणि हरियाणात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला.

दरम्यान, महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. तर हरियाणात 1.82 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात 1.8 लाख ईव्हीएम मशीन्सचा मतदानात वापर होणार आहे. तर राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरपर्यंत आहे. महाराष्ट्रात 288 तर हरियाणात 90 जागांवर निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर होण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या काळात खास सुरक्षा व्यवस्था राज्यांना पुरवण्यात येणार आहे. निवडणुकीत प्लास्टिकचा वापर टाळण्याचे निर्देशही यावेळी निवडणुक आयोगाकडून देण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांनी आपली गुन्हेगारीविषयीची माहिती आयोगाला देणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

– अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
– नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
-अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
-अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
-मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
-मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019

Leave A Reply

Your email address will not be published.