जळगाव : लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर नाथ फॉऊंडेशनतर्फे गरजू लोकांना खिचडी व जेवणाची पाकीट वाटप करण्यात आली. सामाजिक बांधिलकी व माणुसकीची जाण ठेवत समाजाचे आपण देणे लागतो या उदात्त भावनेतून योगेश साळी यांनी स्व: खर्चातून हा उपक्रम राबवित आहे. गोर-गरीब लोकांसाठी लॉकडाऊन असे पर्यत हा उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. योगेश साळी यांच्याकडून जास्तीतजास्त लोकांना अन्न, जेवण पुरवठा व तूरडाळ दिली जात आहे.
याशिवाय अशा विदारक परिस्थिती अन्नदान करताना प्रशासनाला सहकार्य करत नियमांचे पालन करत योगेश साळी यांनी सोशल डिस्टिंक्शन पळून मास्क लावून स्वतःची काळजी घेत अन्नदानाचे कार्य करत आहेत.