नवी दिल्ली : हैदराबादमधील ‘दिशा’ रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना सकाळी घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्व आरोपींना शुक्रवारी सकाळी ज्या ठिकाणी त्यांनी दुष्कर्म केले, तिथे नेण्यात आले होते. त्यावेळी चारही आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही जण मारले गेले.
यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच सोशल मीडियावर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना काही दिवसांपूर्वीच एका युझरने दिलेल्या सल्ल्याप्रमाणेच एन्काउंटर घटनाक्रम घडल्याची चर्चा आहे. या सल्ल्याच्या ट्वीटचे स्क्रीनशॉटही व्हायरल होत आहे.मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटला रिट्विट करत त्या युझरने म्हंटले कि, आरोपींना घटनास्थळी नेऊन तेथे काय झाले हे याचा जाब त्यांना विचारा. त्यावेळी ते पळून जाण्याचा प्रयत्न करतील आणि तेव्हाच त्यांना गोळ्या घाला असा सल्ला दिला होता.
And the prophetic @konafanclub account goes missing. pic.twitter.com/aobY2j5wjO
— Ryan Frantz (@iluvcranberries) December 6, 2019
Looks like they(police) really liked this script…. #Encounter pic.twitter.com/CiAx5xiPVY
— Prakash Shetty (@kitneka) December 6, 2019