भुसावळ प्रतिनिधी :- येथील आनंद नगर भागातील रहिवाशी भूषण उर्फ बंटी विजय किरंगे या मुलाने दिनांक 8 ऑगेस्ट 19 तापी पत्रातून पुरामध्ये उडी मारली होती.त्याचा शोध घेतला असता कुठेही न मिळाल्याने मुलाच्या आईने शहर पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तापी नदीला आलेल्या पुरात भुसावळातील आनंद नगर भागातील रहिवाशी भूषण उर्फे बंटी विजय किरंगे वय 21 या मुलाने दिनांक 8 ऑगेस्ट 19 रोजी उडी मारली होती.त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तापी नदीच्या दोघ पात्राच्या बाजूने शेळगाव बॅरीक पर्यत शोध घेतला असता कुठेही मिळून आला नसल्याने तसेच तापी नदी गुजरात मध्ये सुरत पर्यत जात असल्याने नातेवाईकांनी सुरत पर्यत बंटीचा शोध घेतला असता कुठेही न मिळाल्याने बंटीचा आईने शहर पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर क्रमांक 06/2019 प्रमाणे दिनांक 24 डिसेंबर 19 रोजी नोंद क्रमांक 21 वर 13/38 प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.