जे मुघलांना, इंग्रजांना जमले नाही ते ही तुम्हीच करून दाखवलं- वि.हिं.प

0

भडगाव, प्रतिनधी सागर महाजन

भडगाव तहसील व पोलीस ठाण्याच्या समोर भजन कीर्तन सह विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार रमेश देवकर यांना देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा धर्म प्रसार प्रमुख नाना हाडपे, हरिभक्त परायण – धनश्री ताई शिंदे, विं. हिं.प. प्रखंड अध्यक्ष विनय देशपांडे, बजरंग दल प्रखंड संयोजक विनोद पाटील, बजरंग दल शहर संयोजक साजन पाटील, वि. हीं.प. प्रखंड सहमंत्री शरद हिरे, बजरंग दल शहर सह संयोजक गोपाल वाडेकर, तेजस पाटील, हेमंत ठाकरे, मयुर पाटील, सुरेश सोनवणे, वृत्तीक ठाकरे, अक्षय पाटील, गौरव धनगर, दिपक महाराज, शाम महाराज, भुषण शंकरराव पवार, चंद्रकांत सोनवणे, पुंडा कुंभार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांना अटक केल्यानंतर त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद याच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्राची भूमी ही साधू – संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभूमी आहे. याच परंपरेतील वारी हा वारकरी सांप्रदाय व व वारकऱ्याच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अविभाज्य घटक आहे. शेकडो वर्षांचा पायी वारीची ही परंपरा मुघलांच्या तसेच इंग्रजांच्या काळात ही अबाधित होती.

परंतु गेल्या वर्षी कोरोना संक्रमनामुळे पायी वारीची परंपरा खंडित झाली. पारतंत्र्यात किंवा स्वतंत्र भारतात उपासने करता कधीही कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नाही. किंवा धर्मसत्तेने कधीही राज्यसत्तेकडे तशी परवानगी मागितली नाही.देशात सर्वत्र जन जीवन सामान्य होत आहे.

हॉटेल्स, मॉल्स, दारूची दुकाने,बाजारपेठा ,लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरू आहेत.त्यात विना मास्क फिरणाऱ्या शेकडो – हजारोंची गर्दी होत आहे.लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत.असे असताना वारकऱ्यांच्या उपासनेच्या मूलभूत अधिकारांवर गदा का आणण्यात येत आहे? महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना वारीला विरोध का करण्यात येत आहे? कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने ही फक्त शिस्तप्रिय वारकऱ्यांवर का लादली जात आहेत? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.

वारकऱ्यांच्या माफक मागण्या -: 

१) ७५० वर्षांची पायी वारीची परंपरा आहे. तसेच या वर्षी तुकाराम महाराजांचा ३६० वा पालखी सोहळा आहे.

२) निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ,  तुकाराम या मानाच्या १० पालख्यांसोबत साधारण ३५० ते ४०० पालख्या पंढरपुरात दाखल होतात. म्हणून या प्रत्येक पालखीच्या किमान ३ ते ४ लोकांना वारी करून द्यावी.

३) मानाच्या प्रत्येक पालखी सोबत किमान ५०० लोकांना पायी वारी करण्याची परवानगी द्यावी.

४) ह्यात फक्त दोन्ही डोस पूर्ण झालेल्यानाच कोरोना चे नियम पाळून RTPCR तपासणी करून प्रवासाची परवानगी द्यावी.

५) सकाळी प्रवासात अडचण असल्यास वारकरी वारीचा प्रवास रात्री करतील.

६) संक्रमणाचा धोका असल्यास वारकरी गावाबाहेर माळरानात मुक्काम करतील.

७) ज्येष्ठ सप्तमी ते एकादशी अशी २० दिवसांची वारी आम्ही हवी तर १० दिवसात पूर्ण करू.

८) तसेच गरज भासल्यास राज्याने केंद्रीय फोर्स मागवावा.

विविध स्तरांवरील झालेल्या बैठकीत वारकऱ्यांना निदर्शनास आले. शासनाने – प्रशासनाने वारकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रत्यक्ष बैठकीत झालेली चर्चा व त्यानंतर काढलेल्या अध्यादेशात प्रचंड तफावत आढळून आली. सरकारने वारकऱ्यांना चर्चेला बोलावून त्यांची दिशाभूल केली आहे. विविध सरकारी जाहीर कार्यक्रमात, तसेच पालक मंत्रांच्या दौऱ्यात जमणाऱ्या कार्यकर्त्यांची कोविड टेस्ट करण्यात येते का? पंढरपुरात च झालेल्या मतदान प्रक्रियेच्या प्रचार सभांना कोरोनाची नियमावली लागू होत नव्हती का? कोरोना हा फक्त आषाढी – कर्तिकेचा पायी वारितच वाढतो आणि वारकऱ्या मार्फतच पसरतो का?

सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटांचा फायदा घेत पोलिस प्रशासनाच्या बळाने वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय बंडा तात्या

कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे.

भर रस्त्यात वारकऱ्यांचे पारंपारीक गणवेश उतरवायला लावून, हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भागवत पतक्याची अवहेलना करणाऱ्या, आदरणीय हरी भक्त पारायण निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या आदरणीय हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेबांचा सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्र्यानी वारकऱ्यांची तात्काळ माफी मागितली पाहिजे. तसेच जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकऱ्यांना तात्काळ मुक्त करावे त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे मागे घ्यावे.

याबरोबरच मा. मुख्यमंत्र्यानी या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारी पूजेसाठी पंढरपुरात येवू नये. तसेच लवकरात लवकर सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्र व्यापी तीव्र आंदोलनचा इशारा देण्यात येत आहे.

यानंतरही साधू संतांची, वारकऱ्यांची होणारी अवहेलना न थांबल्यास संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी वारकरी संत समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरेल. याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.