जळगाव जिल्ह्याला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचा राष्ट्रीय पुरस्कार

0

नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यास ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. देशातील 5 राज्ये व 20 जिल्ह्यांना केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते नवी दिल्लीत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभास महिला व बालविकास राज्यमंत्री देवोश्री चौधरी, सचिव श्री. रविंद्र पनवर, अपर सचिव के. मोझेस चलाई तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.