जळगाव : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी)विरोधात आज मंगळवारी संविधान नागरिक कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर ”संविधान बचाव देश बचाव” रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. ही रॅली खान्देश मॉल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आली. या रॅलीत मोठा जनसमुदाय एकवटला आहे. यामध्ये विविध ५० संघटना सहभागी होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी ही रॅली काढण्यात आली.
या रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल होता. रॅलीच्या मार्गावरची येणारी व जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरु करण्यात आली होती. नेहरु पुतळयाकडून येणारी व जाणारी वाहतुकही एकेरी मार्गाने सुरु करण्यात आली होती.